11.3 C
New York
Saturday, May 2, 2026

Buy now

spot_img
Home Blog

‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा’ ही जिल्ह्याच्या शैक्षणिक भविष्यातील मोठी गुंतवणूक : संदीप एकनाथ गावडे

दहावी-बारावी नंतरच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आतापासूनच तयार करण्याचा मानस

सावंतवाडी दि.३०: “शिक्षण क्षेत्रात केलेले काम ही भविष्यातील प्रगत भारतासाठी केलेली गुंतवणूक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ दहावी-बारावीच्या परीक्षेपुरते मर्यादित न राहता, भविष्यातील UPSC, MPSC आणि बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांसाठी आतापासूनच सक्षम व्हावे, याच उद्देशाने ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा’ सुरू करण्यात आली आहे,” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांनी केले.
सावंतवाडी येथे आयोजित ‘यशवंत शिष्यवृत्ती’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी या उपक्रमामागची भूमिका आणि प्रवासाचा आढावा घेतला.
खडतर प्रवासातून शिक्षणाची जिद्द
आपल्या भाषणात संदीप गावडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “२००२ पर्यंत आमच्या गावात साधे रस्तेही नव्हते. दाणोलीतून पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत असे. अशा कठीण परिस्थितीतून ज्यांनी शिक्षण पूर्ण केले, त्यांचा हा गौरव आहे. माझे बंधू कै. यशवंत गावडे यांच्या नावाने सुरू केलेला हा उपक्रम केवळ सत्कार सोहळा नसून ती एक शैक्षणिक चळवळ आहे,” असे त्यांनी नमूद केले.
नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि नियोजन
२०१५ पासून वही वाटपाच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास आता शिष्यवृत्ती स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे.भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम ठरवताना तो नाविन्यपूर्ण असेल, याची काळजी घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना ओएमआर (OMR) शीटवर उत्तरे डार्क करण्याची सवय आतापासूनच व्हावी, जेणेकरून भविष्यात त्यांना स्पर्धा परीक्षा कठीण वाटणार नाहीत, हा यामागचा तांत्रिक उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व शाखांचे महत्त्व समान
करिअर मार्गदर्शनावर बोलताना गावडे म्हणाले की, “समाजात कला (Arts) शाखेला विनाकारण कमी लेखले जाते, पण प्रत्यक्षात सायन्स इतकेच आर्ट्सलाही महत्त्व आहे. १० वी आणि १२ वी नंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात जावे, यासाठी लवकरच करिअर मार्गदर्शनाचे शिबिरही आयोजित केले जाईल.”
शिक्षणाची ताकद आणि संविधानाचा आदर्श
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा दाखला देत गावडे म्हणाले की, “बाबासाहेबांनी प्रचंड अपमान आणि वाईट परिस्थिती सोसली, पण त्यांनी देशाचे भविष्य लिहिताना कधीही राग मनात धरला नाही. त्यांनी केवळ शिक्षणाच्या जोरावर देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणारे संविधान दिले. हीच शिक्षणाची ताकद ओळखून आपण ही छोटीशी गुंतवणूक करत आहोत. यातूनच भविष्यातील अधिकारी आणि समाज घडेल.”
या कार्यक्रमाला उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३० एप्रिल हा शाळेचा शेवटचा दिवस असल्याने मुलांच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी याच दिवशी हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचेही गावडे यांनी स्पष्ट केले.

दिवंगत यशवंत गावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या परीक्षेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी, हा मुख्य उद्देश असल्याचे संदीप गावडे यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान यशवंत गावडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परीक्षेत अव्वल ठरलेल्या १० विद्यार्थ्यांना सायकली देऊन गौरविण्यात आले, तर इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके व प्रशस्तीपत्रे देण्यात आली. यावेळी १०वी-१२वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची मागणीही पुढे आली, ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यावेळी व्यासपीठावर आयोजक संदीप गावडे, वडील एकनाथ गावडे,आई सुनिता गावडे, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर,पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नितीन मुळीक, जि.प सदस्या शोभाताई गावडे, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शिंदे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म. ल. देसाई, गेळे सरपंच सागर ढोके, अनिकेत आसोलकर, चौकूळ सरपंच गुलाबराव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कै. यशवंत गावडे यांच्या स्मृतीला वंदन
अमेरिकेमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन पावलेले यशवंत गावडे यांच्या स्मरणार्थ या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यशवंत हे दशाक्रोशीतील पहिले आयटी इंजिनिअर होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना संपूर्ण सभागृकाने दोन मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या संदीप गावडे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

तरुणांना संधी अन् संघटनेची बांधणी; वैभव नाईक यांचा शिवसैनिकांना ‘सावंतवाडी’तून निर्धार

सावंतवाडी दि.२९: “येत्या दोन वर्षांचा काळ आपल्यासाठी महत्त्वाचा असून, या काळात शिवसेना संघटना पुन्हा जोमाने बांधूया. यापुढे संघटनेत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाईल,” असे आश्वासन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिले.

जिल्हाप्रमुख पदाची धुरा स्वीकारल्यानंतर वैभव नाईक यांनी बुधवारी प्रथमच सावंतवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रचंड जल्लोषात शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.

वैभव नाईक यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

तरुणांना प्राधान्य: संघटनेच्या आगामी वाटचालीत तरुण रक्ताला संधी देऊन नवीन नेतृत्व फळी उभी केली जाईल.

जुने-नवे एकत्र येणार: जे कार्यकर्ते सध्या प्रवाहाबाहेर आहेत, त्यांना पुन्हा एकत्र आणून विश्वासाने काम केले जाईल.

विभागीय बैठका: शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी लवकरच जिल्हाभरात विभागीय बैठकांचे आयोजन करण्यात येईल.हत्ती हटाव मोहीम: जिल्ह्यात वन्य हत्तींचा प्रश्न गंभीर असून, या प्रश्नावर लवकरच मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रकांत कासार, राजू शेटकर, बाळा गावडे, रमेश गावकर, शैलेश गावंडळकर, सीमा मठकर, नम्रता झारापकर, श्रृतिका दळवी यांसह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

“आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. संघटना वाढवणे आणि शिवसैनिकांचे प्रश्न सोडवणे हेच आमचे प्रथम कर्तव्य असेल.”

— वैभव नाईक (जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा)

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात वैभव नाईक यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी बाळा गावडे, चंद्रकांत कासार, निशिकांत तोरसकर आणि रमेश गावकर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

कुडाळ बसस्थानकात खळबळ: एसटी बसमध्ये चढताना महिलेच्या दागिन्यांची पिशवी लंपास

दोन लाख ५५ हजारांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

कुडाळ दि.२९: बसस्थानकात एसटी बसमध्ये चढत असताना एका प्रवाशी महिलेच्या पर्समधून सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. या चोरीत सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले असून, याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सुप्रिया सचिन पेंडूरकर (वय ३९, सध्या रा. अंधेरी, मुंबई; मूळ रा. चौके कुळकरवाडी, ता. मालवण) या आपल्या पतीसह गावी धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. बुधवारी सकाळी तेजस एक्स्प्रेसने प्रवास करून त्या दुपारी २ वाजता कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरल्या. त्यावेळी त्यांच्याकडील पर्समध्ये दागिन्यांचे पाऊच सुरक्षित होते.

रेल्वे स्थानकावरून रिक्षाने त्या कुडाळ बसस्थानकावर आल्या. दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ-पेंडूर-मालवण मार्गावरील एसटी बस फलाटावर लागली. गर्दी असल्याने पती सचिन हे आधी बसमध्ये चढले आणि त्यांच्या पाठोपाठ सौ. सुप्रिया बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये सीटवर बसल्यावर पर्सची चेन अर्धवट उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने त्यांनी पर्स तपासली असता, त्यातील सोन्याच्या दागिन्यांचे पाऊच गायब असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी बसमध्ये आणि परिसरात शोधाशोध केली, मात्र पाऊच मिळून आले नाही.

या चोरीत सोन्याचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार, दोन बांगड्या, अंगठी आणि कानातले बट्टू असा एकूण २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाला आहे. या घटनेनंतर सौ. सुप्रिया यांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक सखाराम भोई पुढील तपास करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या जागीच आता ‘मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय; दीपक केसरकरांची मोठी घोषणा

सावंतवाडी दि.२९ : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सद्यस्थितीतील जागेवरच आता अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आमदार आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित ‘जनता आरोग्य दरबारात’ ते बोलत होते.

प्रकल्पातील अडथळे आणि नवीन संकल्पना
आरोग्य दरबारात बोलताना केसरकर यांनी स्पष्ट केले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना त्यांनीच मांडली होती. मात्र, राजघराण्यातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. आता ही अडचण दूर करून जुन्या जागेवरच नव्या जोमाने हॉस्पिटलचे काम सुरू केले जाईल, असा दावा त्यांनी केला.

आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पावले
केसरकर यांनी आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या:

डॉक्टरांना अतिरिक्त वेतन: जिल्ह्यातील रिक्त पदांचा प्रश्न सोडवण्यासाठी जे डॉक्टर सिंधुदुर्गात सेवा देण्यास तयार आहेत, त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून अतिरिक्त मानधन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

कंत्राटदारांना इशारा: जिल्ह्यातील कामांच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त करत, निधी असूनही निकृष्ट कामामुळे प्रकल्प रेंगाळत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक नियुक्त्या: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

“माझ्यासारखी वेळ दुसऱ्यावर येऊ नये…” – दिव्यांग तरुणीच्या व्यथेने सभागृह हेलावले
या आरोग्य दरबारात चैताली तेंडुलकर या २० वर्षीय दिव्यांग तरुणीने आपली आपबिती मांडली तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. लहानपणी वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागल्याची व्यथा तिने मांडली. “माझ्यावर जी वेळ आली, ती जिल्ह्यातील इतर कोणत्याही मुलावर येऊ नये,” ही तिची आर्त हाक ऐकून प्रशासकीय यंत्रणेला जिल्ह्यातील आपत्कालीन सुविधांच्या भीषण वास्तवाची जाणीव झाली.

जनतेचे प्रश्न आणि मान्यवरांची उपस्थिती
या दरबारात सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी विविध समस्या मांडल्या:

गुणेश गवस (वाफोली): निवडणुकीतील आश्वासनांची आठवण करून दिली.
हेमंत वागळे: मळेवाड येथील पीएम रूमचा प्रश्न उपस्थित केला.
सुर्या पालव: डायलिसिस सुविधेच्या गरजेवर भर दिला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंत घराण्याचा तेजस्वी वारसा अन् ध्येयवेडं नेतृत्व: विक्रांत सावंत यांच्या कार्याचा झंझावात!

सावंतवाडी दि.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे युवा नेतृत्व विक्रांत सावंत यांनी आपल्या प्रभावी कार्यशैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी मंत्री स्वर्गीय भाई सावंत आणि स्वर्गीय विकासभाई सावंत यांचा लोकसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेत, विक्रांत सावंत आज जनतेच्या आशा-आकांक्षांचे केंद्रबिंदू बनले आहेत.

परंपरेचा दीपस्तंभ आणि शैक्षणिक वारसा
स्वर्गीय भाई सावंत यांनी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली, तर स्वर्गीय विकासभाईंनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून या कार्याला नवी उंची दिली. विकासभाईंच्या निधनानंतर ही मोठी जबाबदारी विक्रांत सावंत यांच्या खांद्यावर आली. शिक्षण प्रसारक मंडळाच्या धुरा यशस्वीपणे सांभाळत त्यांनी आपल्या व्यवस्थापकीय कौशल्याची आणि अभ्यासू वृत्तीची प्रचिती दिली आहे.

राजकीय यशाचा जाहीरनामा
भाजपच्या तिकिटावर माजगाव जिल्हा परिषद गटातून मिळवलेला विक्रमी विजय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर झालेली निवड, हा त्यांच्या नियोजनकौशल्याचा विजय मानला जातो. नुकत्याच झालेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या रणनीतीमुळे रंजना कानसे यांनी मिळवलेला विजय हा सावंत घराण्याच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा मोहोर उमटवणारा ठरला आहे.

विधायक उपक्रमांतून समाजपरिवर्तन
केवळ राजकारण न करता सामाजिक ऋणाची जाणीव ठेवत विक्रांत सावंत यांनी अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत:

शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण: तरुणांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी मर्दानी खेळांचे प्रशिक्षण सुरू केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा: जिल्ह्यातून उत्तम अधिकारी घडावेत या हेतूने स्पर्धा परीक्षांना प्रोत्साहन दिले जात आहे.

पायाभूत सुविधा: मतदारसंघातील रस्ते, मंदिरांचे सुशोभीकरण आणि वाडी-वस्तीवरील समस्या सोडवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

सर्वसमावेशक नेतृत्व आणि विनम्रता
विक्रांत सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘सर्वपक्षीय स्वीकारार्हता’. पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांनी राणे परिवारापासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यापर्यंत सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत. उच्चविद्याविभूषित असूनही त्यांच्यातील साधेपणा आणि विनम्रता यामुळे ते युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे लाडके ‘आयडॉल’ बनले आहेत.

पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, मनीष दळवी यांसह अनेक दिग्गजांनी त्यांच्या कार्यशैलीचे वेळोवेळी कौतुक केले आहे. समाजकारण, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत गगनभरारी घेणारा हा ‘सावंत परिवाराचा कुलदीपक’ भविष्यात महाराष्ट्राच्या नकाशावर आपली अमिट छाप उमटवेल, असा विश्वास जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. श्री देव पाटेकर आणि ग्रामदेवता सातेरीच्या आशीर्वादाने त्यांची ही घोडदौड अशीच सुरू राहो, अशा शुभेच्छा सध्या संपूर्ण जिल्ह्यातून दिल्या जात आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

माजगावात महायुतीचा गुलाल; रंजना कानसे थेट सरपंचपदी विजयी

जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा करिष्मा पुन्हा सिद्ध; अपक्ष उमेदवाराचा १५८ मतांनी पराभव

सावंतवाडी दि.२९: तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवार रंजना रवींद्र कानसे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव करत विजय संपादन केला. या विजयामुळे माजगावात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष केला.

अटीतटीची लढत आणि मतदानाची आकडेवारी

या निवडणुकीत सरासरी ४०.११ टक्के इतके मतदान झाले होते. एकूण ४,१८५ मतदारांपैकी १,६७९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८९७ पुरुष आणि ७८२ महिला मतदारांचा समावेश होता.

मतमोजणीचा तपशील:

रंजना रवींद्र कानसे (महायुती): ८८२ मते,जयश्री दिनेश सावंत (अपक्ष): ७२४ मते,विजयी मताधिक्य: १५८ मते मिळाली.

निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी माजगाव परिसरात गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून विजयाचा उत्सव साजरा केला. या विजयामुळे स्थानिक राजकारणात महायुतीचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे.

विक्रांत सावंत यांची ताकद अधोरेखित

या निवडणुकीच्या निकालाने जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी माजगाव परिसरातील आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. हा विजय म्हणजे महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सांघिक कष्टाचे फळ असल्याची प्रतिक्रिया श्री. सावंत यांनी व्यक्त केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

माजगाव सरपंच पोटनिवडणुकीत ४० टक्के मतदान; महायुती विरुद्ध अपक्ष लढतीचा निकाल बुधवारी

सावंतवाडी दि.२८: तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी मंगळवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी अत्यंत थंड प्रतिसाद दिला. वाढत्या उष्णतेचा परिणाम मतदानावर दिसून आला असून, दिवसभरात केवळ ४०.११ टक्के मतदान झाले आहे. महायुती विरुद्ध अपक्ष अशा या दुरंगी आणि अटीतटीच्या लढतीचा निकाल बुधवारी सकाळी १० वाजता सावंतवाडी तहसील कार्यालयात स्पष्ट होईल.

माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी भाजपा महायुती पुरस्कृत रंजना रवींद्र कानसे आणि अपक्ष जयश्री दिनेश सावंत यांच्यात थेट लढत होत आहे. माजी सरपंच दिनेश सावंत यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, मात्र दिवसभर मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. एकूण ४,१८५ मतदारांपैकी केवळ १,६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८९७ पुरुष तर ७८२ महिला मतदारांचा समावेश आहे.

प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी:प्रभाग १ मध्ये ५११ (एकूण १००१), प्रभाग २ मध्ये ३५० (एकूण ७३८), प्रभाग ३ मध्ये १९३ (एकूण ८७०), प्रभाग ४ मध्ये ३१३ (एकूण ८३१) तर प्रभाग ५ मध्ये ३१२ (एकूण ७४५) मतदारांनी मतदान केले. प्रभाग ३ मध्ये सर्वात कमी प्रतिसाद पाहायला मिळाला. दुपारनंतर उष्णता कमी झाल्यावर गर्दी वाढेल ही अपेक्षा देखील फोल ठरली.

दरम्यान, नाणोस ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठीही मतदान पार पडले. या ठिकाणी १५४ पैकी ८७ मतदारांनी हक्क बजावला असून ५६.४९ टक्के मतदान झाले आहे. माजगावच्या तुलनेत नाणोसमध्ये मतदानाची टक्केवारी समाधानकारक राहिली.

दोन्ही उमेदवारांनी गेल्या आठ दिवसांत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. आता या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार आणि माजगावचा नवा सरपंच कोण होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी अधिकारी यशवंत परब काम पाहत आहेत. मते कमी असल्याने मतमोजणी सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात निकाल स्पष्ट होईल, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

सावंतवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; एकाच रात्री तीन ठिकाणी धाड

सावंतवाडी दि.२८: पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे राबवलेल्या विशेष मोहिमेत अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ या अवघ्या पाच तासांच्या कालावधीत पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून एकूण १६,१०० रुपयांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाईचा तपशील

पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरापर्यंत ही धडक मोहीम राबवली. कारवाईचे ठिकाण आणि जप्त करण्यात आलेल्या मद्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:१. कोलगाव (कुंभयाळवाडी): सायंकाळी ७ च्या सुमारास रवींद्र लक्ष्मण राऊळ (वय ४९) याच्याकडून १०,१०० रुपये किमतीच्या सुमारे १०० दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

२. माजगाव (ख्रिश्चनवाडी): रात्री पावणे आठच्या सुमारास लुईस अंतोन देसा (वय ६१) याच्या ताब्यातून १,९०० रुपये किमतीच्या १९ बाटल्या हस्तगत केल्या.

३. कलंबिस्त (ख्रिश्चनवाडी): या कारवाईत झूजे मोतेस रोड्रिक्स (वय ६७) याच्याकडून ४,१०० रुपये किमतीच्या १८ विविध बाटल्या जप्त करण्यात आल्या.

संयुक्त पथकाची कारवाई

ही धडक मोहीम स्थानिक गुन्हे शाखेचे पी.एस.आय. सुधीर सावंत, हवालदार प्रकाश कदम तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पी.एस.आय. माधुरी मुळीक, हवालदार मनोज राऊत, अमित राऊळ, दीपक शिंदे आणि धोत्रे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

रात्री उशिरा या तिन्ही संशयितांवर अवैध दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे सावंतवाडी परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळातही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडीतील बनावट नोटांचे धागेदोरे सांगलीपर्यंत; सहा संशयितांना अटक

सावंतवाडी दि.२८: शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत भरलेल्या रकमेत २०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सांगली येथील बनावट नोटांच्या कारखान्याशी असलेले कनेक्शन उघड केले आहे. याप्रकरणी सांगली कारागृहात असलेल्या सहा आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिकृतपणे अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बँकेच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड
शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात पैसे जमा केले होते. यावेळी कॅशियरच्या तपासणीत २०० रुपयांच्या आठ नोटा (एकूण १६०० रुपये) बनावट असल्याचे निदर्शनास आले. या नोटांबाबत ग्राहकाकडे चौकशी केली असता, चलनातून या नोटा आपल्याकडे आल्याचे त्याने सांगितले. बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

सांगली कनेक्शन आणि आरोपींची अटक
सावंतवाडीत जप्त केलेल्या बनावट नोटांचे सिरीयल नंबर आणि सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील नोटांचे सिरीज नंबर एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सांगली पोलिसांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्या गुन्ह्यातील सहा आरोपी सध्या सांगली कारागृहात होते.

सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने न्यायालयातून परवानगी मिळवून या सहा संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुढील संशयितांचा समावेश आहे:
सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, कोल्हापूर)
राहुल राजाराम जाधव (वय ३३, कोल्हापूर)
इब्रार आदम इनामदार (वय ४४, कोल्हापूर)
नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, कोल्हापूर)
संदीप बाळू कांबळे (वय ३८, कोल्हापूर)
सिद्धेश जगदीश म्हात्रे (वय ३८, मालाड, मुंबई) अशी नावे आहेत.

कोकण आणि गोवा पोलिसांच्या रडारवर
बनावट नोटांची व्याप्ती आता कोकण आणि गोवा राज्यापर्यंत पसरली असण्याची दाट शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. “सांगली-कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात या रॅकेटचे धागेदोरे आहेत. कोकणातही या नोटा वितरित झाल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज असून, नागरिकांनी अशा नोटा आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या अटकेमुळे बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 सातार्डा: श्री देव महादेव पंचायतन मंदिरात शनिवारी १ मे रोजी गणपती बाप्पाचे आगमन! 🚩

सातार्डा दि.२८: येथील भाविकांसाठी एक आनंदाची आणि भक्तीची पर्वणी! येत्या १ मे शनिवारी  श्री देव रवळनाथ पंचायतनमधील श्री देव महादेवाच्या मंदिरात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

या मंगलमयी सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर पणत्यांच्या दिव्य प्रकाशाने उजळून निघणार आहे. या दीपोत्सवात सहभागी होऊन बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!

✨ विशेष आवाहन:

सर्व भाविकांनी आपापल्या घरून पणत्या, तेल आणि वाती तयार करून आणायच्या आहेत. सर्वांच्या सामूहिक सहभागातून आपण हे मंदिर प्रकाशाने न्हाऊन टाकूया!

⏰ वेळ: सायंकाळी ठीक ६:०० वाजता📍 स्थळ: श्री देव रवळनाथ पंचायतनाचे, महादेव मंदिर, सातार्डा.

🏗️ मंदिराचा जीर्णोद्धार: सेवेची सुवर्णसंधी

सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे पवित्र कार्य सुरू आहे. या ऐतिहासिक कार्याला आपल्या मदतीची जोड द्या. भाविकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे सढळ हस्ते आर्थिक मदत करावी, जेणेकरून आपल्या श्रद्धास्थानाचे वैभव अधिक वृद्धिंगत होईल.🙏🏻 चला तर मग, १ मे रोजी सायंकाळी बाप्पाच्या स्वागताला एकत्र येऊया!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563