दहावी-बारावी नंतरच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आतापासूनच तयार करण्याचा मानस
सावंतवाडी दि.३०: “शिक्षण क्षेत्रात केलेले काम ही भविष्यातील प्रगत भारतासाठी केलेली गुंतवणूक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ दहावी-बारावीच्या परीक्षेपुरते मर्यादित न राहता, भविष्यातील UPSC, MPSC आणि बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांसाठी आतापासूनच सक्षम व्हावे, याच उद्देशाने ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा’ सुरू करण्यात आली आहे,” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांनी केले.
सावंतवाडी येथे आयोजित ‘यशवंत शिष्यवृत्ती’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी या उपक्रमामागची भूमिका आणि प्रवासाचा आढावा घेतला.
खडतर प्रवासातून शिक्षणाची जिद्द
आपल्या भाषणात संदीप गावडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “२००२ पर्यंत आमच्या गावात साधे रस्तेही नव्हते. दाणोलीतून पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत असे. अशा कठीण परिस्थितीतून ज्यांनी शिक्षण पूर्ण केले, त्यांचा हा गौरव आहे. माझे बंधू कै. यशवंत गावडे यांच्या नावाने सुरू केलेला हा उपक्रम केवळ सत्कार सोहळा नसून ती एक शैक्षणिक चळवळ आहे,” असे त्यांनी नमूद केले.
नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि नियोजन
२०१५ पासून वही वाटपाच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास आता शिष्यवृत्ती स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे.भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम ठरवताना तो नाविन्यपूर्ण असेल, याची काळजी घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना ओएमआर (OMR) शीटवर उत्तरे डार्क करण्याची सवय आतापासूनच व्हावी, जेणेकरून भविष्यात त्यांना स्पर्धा परीक्षा कठीण वाटणार नाहीत, हा यामागचा तांत्रिक उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व शाखांचे महत्त्व समान
करिअर मार्गदर्शनावर बोलताना गावडे म्हणाले की, “समाजात कला (Arts) शाखेला विनाकारण कमी लेखले जाते, पण प्रत्यक्षात सायन्स इतकेच आर्ट्सलाही महत्त्व आहे. १० वी आणि १२ वी नंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात जावे, यासाठी लवकरच करिअर मार्गदर्शनाचे शिबिरही आयोजित केले जाईल.”
शिक्षणाची ताकद आणि संविधानाचा आदर्श
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा दाखला देत गावडे म्हणाले की, “बाबासाहेबांनी प्रचंड अपमान आणि वाईट परिस्थिती सोसली, पण त्यांनी देशाचे भविष्य लिहिताना कधीही राग मनात धरला नाही. त्यांनी केवळ शिक्षणाच्या जोरावर देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणारे संविधान दिले. हीच शिक्षणाची ताकद ओळखून आपण ही छोटीशी गुंतवणूक करत आहोत. यातूनच भविष्यातील अधिकारी आणि समाज घडेल.”
या कार्यक्रमाला उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३० एप्रिल हा शाळेचा शेवटचा दिवस असल्याने मुलांच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी याच दिवशी हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचेही गावडे यांनी स्पष्ट केले.
दिवंगत यशवंत गावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या परीक्षेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी, हा मुख्य उद्देश असल्याचे संदीप गावडे यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान यशवंत गावडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परीक्षेत अव्वल ठरलेल्या १० विद्यार्थ्यांना सायकली देऊन गौरविण्यात आले, तर इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके व प्रशस्तीपत्रे देण्यात आली. यावेळी १०वी-१२वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची मागणीही पुढे आली, ज्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यावेळी व्यासपीठावर आयोजक संदीप गावडे, वडील एकनाथ गावडे,आई सुनिता गावडे, सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर,पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नितीन मुळीक, जि.प सदस्या शोभाताई गावडे, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शिंदे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म. ल. देसाई, गेळे सरपंच सागर ढोके, अनिकेत आसोलकर, चौकूळ सरपंच गुलाबराव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कै. यशवंत गावडे यांच्या स्मृतीला वंदन
अमेरिकेमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन पावलेले यशवंत गावडे यांच्या स्मरणार्थ या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यशवंत हे दशाक्रोशीतील पहिले आयटी इंजिनिअर होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना संपूर्ण सभागृकाने दोन मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करणाऱ्या संदीप गावडे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.२९: “येत्या दोन वर्षांचा काळ आपल्यासाठी महत्त्वाचा असून, या काळात शिवसेना संघटना पुन्हा जोमाने बांधूया. यापुढे संघटनेत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाईल,” असे आश्वासन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिले.
कुडाळ दि.२९: बसस्थानकात एसटी बसमध्ये चढत असताना एका प्रवाशी महिलेच्या पर्समधून सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. या चोरीत सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले असून, याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी दि.२९ : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सद्यस्थितीतील जागेवरच आता अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आमदार आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित ‘जनता आरोग्य दरबारात’ ते बोलत होते.
सावंतवाडी दि.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे युवा नेतृत्व विक्रांत सावंत यांनी आपल्या प्रभावी कार्यशैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी मंत्री स्वर्गीय भाई सावंत आणि स्वर्गीय विकासभाई सावंत यांचा लोकसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेत, विक्रांत सावंत आज जनतेच्या आशा-आकांक्षांचे केंद्रबिंदू बनले आहेत.
सावंतवाडी दि.२९: तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवार रंजना रवींद्र कानसे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव करत विजय संपादन केला. या विजयामुळे माजगावात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष केला.
सावंतवाडी दि.२८: तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी मंगळवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी अत्यंत थंड प्रतिसाद दिला. वाढत्या उष्णतेचा परिणाम मतदानावर दिसून आला असून, दिवसभरात केवळ ४०.११ टक्के मतदान झाले आहे. महायुती विरुद्ध अपक्ष अशा या दुरंगी आणि अटीतटीच्या लढतीचा निकाल बुधवारी सकाळी १० वाजता सावंतवाडी तहसील कार्यालयात स्पष्ट होईल.